लॉकडाऊनः BSNLने ग्राहकांना दिली 'गुड न्यूज'

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या प्रीपेड सब्सक्रायबर्ससाठी दोन नवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. बीएसएनएलने २० एप्रिल २०२० पर्यंत आपल्या रिचार्जची वैधता वाढवली आहे. तसेच कंपनी कोणतेही पैसे वसुल न करता ग्राहकांना १० रुपयांचा टॉकटाइम फ्रीमध्ये देणार आहे. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे कंपनीच्या ग्राहकांना करोना व्हायरसच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे संकट झेलावे लागणार नाही. त्यांची सेवा सुरू राहणार आहे. लॉकडाऊनच्या काळात जर बीएसएनएल युजर्सची मोबाइल फोनची अवधी संपली असल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. बीएसएनएल ग्राहकांचा फोन २० एप्रिल २०२० पर्यंत सुरू राहू शकणार आहे. तसेच फोनवर बोलण्यासाठी बीएसएनएल कंपनी युजर्संना १० रुपयांचा टॉकटाइम सुद्धा फ्री देत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने हा निर्णय गरीब असलेल्या ग्राहकांसाठी घेतला आहे. ज्या युजर्संची लॉकडाऊन दरम्यान रोजी रोटीसाठी धडपड असेल ते लोक कुठून रिचार्ज करतील. त्यांची सेवा खंडीत होऊ नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या रिचार्जची वैधता संपणार असेल त्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही. २० एप्रिल पर्यंत फोनवर बोलता येवू शकणार आहे. तसेच ग्राहकांना १० रुपयांचा फ्री टॉकटाइम दिला जात आहे. बीएसएनएलचे सीएमडी प्रवीण कुमार पुरवार यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले की, सध्याच्या संकटसमयी बीएसएनएल आपल्या युजर्संसोबत उभा आहे. ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी आपल्या गो डिजिटल वापरण्याचा सल्ला देते. बीएसएनएलने नुकतेच MyBSNL अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून गरजेच्या सेवा रिचार्ज करता येवू शकतात. तसेच प्लान व्हेरिफिकेशन यासारखी सुविधा मिळते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39vPSHd

Comments

clue frame