...तर पुन्हा मोबाइल प्लान दरवाढ होणार

नवी दिल्ली: रिलायन्स जिओसह एअरटेल आणि वोडाफोन-आयडियानेदेखील आपल्या टॅरीफ दरात ४० टक्के वाढ केली होती. या दरवाढीतून ग्राहक सावरेपर्यंत आणखी एक धक्का त्यांना बसणार आहे. तोट्यातून बाहेर येण्यासाठी टेलिकॉम कंपन्या दरवाढ सुरूच ठेवणार असल्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात टेलिकॉम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्पर्धा आणखी तीव्र झाली. अधिकाधिक ग्राहकांना खेचण्यासाठी अनेकांनी आपले टॅरीफ दर घटवले. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना आणखी तोटा सहन करावा लागला असल्याची चर्चा आहे. टेलिकॉम सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, टेलिकॉम कंपन्यांना तोट्यातून बाहेर येण्यासाठी टॅरीफ दरात वाढ सातत्याने करावी लागणार आहे. त्याशिवाय प्रति ग्राहक सरासरी २०० रुपये महसूल इतका मिळवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. टेलिकॉम ऑपरेटर्स कंपनींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सीओएआय या संघटनेने डेटा आणि व्हॉइस कॉलिंगचे दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. यामुळे ग्राहकही गुणवत्तेच्या आधारे आपली टेलिकॉम कंपनी निवडू शकतो असेही त्यांनी म्हटले. नव्या वर्षात पुन्हा दरवाढ? आगामी काही आठवड्यात प्रीपेड प्लानचे टॅरीफ पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ट्रायकडून दर निश्चित करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे समजते. याबाबत, संबंधित घटकांच्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा ट्रायला असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. ट्रायने दर निश्चित केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एअरटेलला फायदा?दर निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेने एअरटेल भारतात सध्या चांगली ४जी सेवा देत आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37brdaa

Comments

clue frame